डोंबिवली प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर
मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे , १२ वर्षे का रखडले मुंबई गोवा महामार्गा चे काम ?, तसेच जर ४ वर्षात समृद्धी महामार्गाचे काम होते मग कोकणच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम का पूर्ण होत नाही ? निधीची कमतरता नसताना का रखडला मुंबई महामार्ग?? या अशा इतर समस्यांचे निराकरण करून रखडलेल्या मुंबई गोवा महामारगाचे काम अंत्यन्त वेगाने मार्गी लागावे म्हणून गेली अनेक महिने सतत पाठपुरावा करणारे काका कदम तसेच त्यांची टीम अहोरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्याचे बांधकाम मंत्री,शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, ठेकेदार तसेच काही आराजकीय संघटना मार्फत संपर्क साधून करीत आहेत. या संपर्क मोहिमेतून आलेल्या अनुभवातून आता काका कदम, श्री.जयवंत दरेकर, ॲड.ओवेस पेचकर, श्री.दीपक चव्हाण, अनिल काडगे उदय सुर्वे, अक्षय महापदी, ॲड.प्रथमेश रावराणे, राजू मुलुख, हरिश्चंद्र शिर्के,प्रकाश तोरसकर, मुरलीधर शिरगावकर यांच्या सहकार्याने आणखीन दोन पाऊल पुढे टाकत बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई गोवा महामार्ग विषया बाबत एक चर्चा सत्र उपक्रम सर्वांकरिता आखले आहे. ही कार्यशाळा येत्या रविवारी दी.२७ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मुंबई डोंबिवली येथे आयोजित केली आहे. या मोहिमेत गेली १२ वर्षे मुंबई गोवा महामार्ग वगळता कोणत्याही महामार्गावर अपघात झाला तर त्याची शासन दरबारी तात्काळ दखल घेतली जाते, तातडीने मदत जाहीर केली जाते; मात्र कोकणच्या अपघातग्रस्तांवर अन्याय का? या सर्वांना जबाबदार असलेल्या अधिकारी, राजकारणी, लोकप्रतिनिधी यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करीत नाही ? मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्या शिवाय टोल आकारणी सुरु करू नका!! अशा अनेक विषयांवर विविध संघटनांकडून विचारले गेलेल्या प्रश्नांवर आंदोलने करून जनजागृती करणाऱ्या सर्व अराजकीय सामाजिक संस्था - संघटना आणि समस्त कोकणस्थ पत्रकार बंधू आणि भगिनीं यांनी सदर चर्चा सत्रात सहभागी होऊन थेट मंत्री महोदयांसोबत संवाद साधून तात्काळ खुलास मिळवावा याकरिता सर्व अराजकीय संस्थांनी सहभागी व्हावे या करीत स्वतः संयोजक काका कदम आणि जयवंत दरेकर, ॲड.ओवेस पेचकर, श्री.दीपक चव्हाण, श्री.अनिल काडगे,श्री. उदय सुर्वे, ॲड.प्रथमेश रावराणे,श्री.राजू मुलुख हे प्रत्येक संस्थेला संपर्क करीत आहेत. कोकणात विचारांची देवाण घेवाण होत नाही म्हणून कधीच येकी होत नाही आता विचारांची देवाण घेवाण तीही थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या बरोबर!! या सुवर्ण संधीचा सर्व सामाजिक संघटना नी लाभ घेवून मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वास जाण्याचा मार्ग सुखकर करूया या करीत जोर लावला आहे. त्यातच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रवींद्र चव्हाण या कोकणच्या सुपुत्राने मंत्रिपदाची धुरा सांभाळल्यापासून गेल्या एक वर्षात रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या संपूर्ण विषयाचा गांभीर्याने अभ्यास करून या कामातील असंख्य अडचणी हुडकून काढल्यामुळेच आता मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कामाला गती आली आहे. मा. रवींद्र चव्हाण यांनी मंत्री पदाची धुरा सांभाळल्या पासून मुंबई - गोवा रोडची आठ(८) वेळा प्रत्यक्ष पाहाणी करून कामावर देखरेख करून कामाचा आढावा घेत नवनवीन तंत्रज्ञान वापरून कामाचा झपाटा लावला आहे. असे झपाटल्यासारखे काम करणारे पहिलेच मंत्री म्हणून आपण सारे कोकणकर आज मोठ्या अपेक्षेने माननीय सार्वजनिक मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांच्याकडे पहात आहोत.मंत्री महोदय रवींद्र चव्हाण स्वतः कोकणस्थ आहेत म्हणून आणि कोकणाशी असलेले अतूट नाते अधिक दृढ करण्यासाठी ते स्वतः करीत असलेल्या प्रयत्ना बरोबरच कोकणच्या विकासाच्या प्रवाहातील मुख्य नाळ असलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी झटणाऱ्या आपल्या सारख्या कोंकणकर, अराजकीय - सामाजिक संस्था, पत्रकार यांच्याकडे त्यांचे मनातील मुंबई - गोवा हायवेचे कामाबाबत काही मुद्दे असतील तर ते समजून घेवून त्यांचे निरसन करून सध्या सुरू असलेले काम अधिक सुसाट वेगाने पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांची मत - मतांतरे जाणून घेण्यासाठी मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी खुले चर्चासत्र आयोजित करून आपणास आपले मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रत्येकाला वैयक्तिक भेटून वेळ वाया घालवण्यापेक्षा एकाच दिवशी समोरासमोर आपापली मते व्यक्त करता यावी. त्यातील योग्य काय आणि अयोग्य काय हे तिथेच ठरवून त्या विचाराने गणपतीपूर्वी खड्डे मुक्त एक लेन सुरू करून घ्यावी. तसेच डिसेंबर २०२३ पर्यंत चौपदरीकरनाचे कामही पूर्ण करून घेण्यासाठी आपण सर्व आदरणीय कोंकणकर एकाच व्यासपीठावर एकत्र येता येईल यासाठी चर्चा सत्राची मागणी केली ती मा.मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी मान्य केली आहे. तसेच ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना मोबदला मिळालेला नाही त्यांनीही कागदपत्रांसह आल्यास त्यांनीही न्याय देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे श्री.जयवंत दरेकर व काका कदम यांनी सांगितले आहे. हे खुले चर्चासत्र ठिकाण डोंबिवली जिमखाना, पेंढारकर कॉलेज समोर,डोंबिवली (पूर्व)
येते रविवारी दि. २७.०८.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत आयोजित केले आहे. चर्चासत्रा नंतर उपस्थित राहिलेल्या कोकणकरांसाठी मंत्री महोदयांच्या पुढाकाराने खास कोकण स्टाईल पाहुणचार करण्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी आपली नावे नोंदविण्यासाठीश्री. जयवंत दरेकर(९८२१५६२५७७) श्री. काका कदम(७५०६२५४४४५) श्री. अक्षय महापदी (८०९७१६७९८७) श्री.राजू मुलुख(८४५१०९७१३६) श्री उदय सुर्वे(७६६६९६५००५) यांच्याशी संपर्क करावा. अशी विशेष सूचनाही केली आहे.