कल्याण प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कार्याध्यक्ष सौ श्रुती उरणकर यांनी कल्याण येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
कल्याण जवळील ठाकुर्ली येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्ष डॉक्टर स्मिता पाटील , कार्याध्यक्ष सौ श्रुती उरणकर , सदस्य सविता ठाकूर , सुनिता मिश्रा , स्वाती हिरवे , नूतन यादव यासह अनेक भगिनी उपस्थित होत्या.
ठाकुर्ली 12 वी बटालियन विभागाचे श्री.डी. आय. जी. हेमंत कुमार., सैन्य सहाय्यक श्री.अजय संसारे, निरीक्षक मुख्यालय श्री.एल व्ही के मूर्ती, निरीक्षक श्री.एन एल श्रीमली, निरीक्षक श्री.पी आर सुदर्शन, निरीक्षक श्री. रणजीत मरांडी, निरिक्षक/ आर्मोरर श्री.एस चौहान, स.उप. निरीक्षक श्री.अर्जुन सिंग, स.उप.निरीक्षक.श्री.शिसराम बौरान स.उप.निरीक्षक श्री.राजू कुमार हे अधिकारी व जवान उपस्थित होते.
यावेळी बोलताना हेमंत के आर यांनी महिला उत्कर्ष समितीच्या उपस्थित सर्व भगिनींचे आभार मानले व म्हणाले की आम्ही घरापासून दूर असतो lत्यामुळे परिवारातील सख्या बहिणी सोबत हा सण क्वचितच साजरा करता येतो परंतु आज महिला समितीने आम्हाला राखी बांधून बहिणीची माया दिली व या सणाचे महत्व विशद केले.