खिलार वाडी प्रतिनिधी
लोकशाहीच्या मार्गाने घेतलेली पत्रकार परिषद व विविध चॅनेल्सने खिलारवाडी गावातील रस्त्याची दाखवलेली सत्य परिस्थिती या सर्व गोष्टींचा धसका घेत अखेर प्रशासनाने आज पासून गावात रस्त्याच्या कामासाठी सुरुवात केली याचं फार मोठ समाधान आम्हाला मिळत आहे.
खिलारवाडी गावामध्ये रघुनाथ टकले वस्ती ते जालिंदर खांडेकर वस्तीपर्यंत मुरमीकरण खडीकरण करण्यासाठी जवळजवळ सहा ते सात महिन्यापासून काम मंजूर होते, परंतु त्यावर निविदा निघत नव्हती, आणि काम चालू होत नव्हते, मागील एक ते दोन पावसामध्ये त्या भागातील लोकांना अतिशय भयानक त्रास झाल्यानंतर, आम्ही समस्त ग्रामस्थ खिलारवाडी यांच्या सहकार्याने पत्रकार परिषद घेतली.
आणि रस्त्यावरची झालेली दुरावस्था चॅनलच्या माध्यमातून दाखवली आणि थोड्याच दिवसात सर्व रस्त्याची कागदपत्रे फोटो वगैरे बांधकाम खात्याला दाखवल्यानंतर, त्यांनी लगेचच आज पासून सिमेंट पायपा टाकून रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे, या अगोदर अनेक वेळा बांधकाम खातं किंवा ज्या व्यक्तीने काम घेतलेले आहे त्यास फोन करून ईचारले असता या कामासाठी निधीच अजून उपलब्ध नाही असे सांगण्यात येत होते. मात्र आपण खिलारवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने आंदोलन उठाव पत्रकार परिषद घेतल्यानंतर आज पासून काम चालू होत आहे याचे फार मोठे समाधान आम्हास मिळत आहे.