सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला.
पंचवीस वर्षांनी( सन१९९७-९८) मित्र- मैत्रिणी एकत्र आल्याने जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते.व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशुले आदी उपस्थित होते.
यावेळी दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक नागेश नकाते, रानमसले येथील ब्रम्हगायत्री विद्यालयचे सहशिक्षक शिवाजी खोबण, चंद्रकुमार कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केले.बाळकृष्ण सोमा,धानम्मा खद्दे, देशपांडे, गोविंद किलकिले,रेवणसिद्ध गौर, कविता सनके आदींनी शाळेच्या विविध आठवणीना उजाळा दिला.शाळेबद्दल प्रेम व आपुलकी तसेच घट्ट मैत्रीमुळेच स्नेहमेळावा घेतल्याने आनंद झाल्याचे मनोगतातून सांगितले.
शिक्षकांच्या कष्टनेच शाळेची प्रगती झाली आहे.भविष्यात माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने महाविद्यालय सुरु करण्याचे मानस आहे.भविष्यात प्रत्येकांच्या सुखदुःखात सहभाग होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अण्णाराव कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली कुंभार यांनी केले तर देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमा, गणेश बोड्डू, कुंभार,धानम्मा खद्दे, नागनाथ सुरगीहळ्ळी, मोहन जाधव आदींनी परिश्रम घेतले.