पंढरपूर प्रतिनिधी
बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये सक्रिय काम करणारे व आक्रमक व्यक्तिमत्त्व असलेले ज्ञानेश्वर जवळेकर यांची भारत राष्ट्र समितीच्या सोलापूर जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आलेली आहे.
ह्या आधी ते बळीराजा शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी काम करत आहेत.गेले 10 ते 12 वर्ष ते शेतकरी संघटनेत काम करत आहेत शेतकऱ्यानं विषयी प्रचंड तळमळ असलेले ज्ञानेश्वर जवळेकर यांनी आता पर्यंत रस्त्यावर उतरून अनेकदा शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली आहेत.
यावेळी ज्ञानेश्वर जवळेकर म्हणाले ,मी स्वतःहा शेतकरी असल्याने शेतकऱ्यांची जाण असणारे नेतृत्वात आज शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या भारत राष्ट्र समिती मध्ये काम करायची संधी मिळाली आहे.मी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत राहीन. आणि पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करेन.तसेच युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याचे जवळेकर यांनी तेज न्युज शी बोलताना सांगितले.