"होलार समाजातील आयएएस होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गळ्यात एक लाख रुपयाच्या नोटांचा हार घालून हत्तीवरून मिरवणूक काढणार" - राज्याचे अध्यक्ष नंदकुमार केंगार यांचे आव्हान
सोलापूर प्रतिनिधी
शनिवार दिनांक २९ जुलै २०२३ रोजी अखिल भारतीय होलार समाज संघटना सोलापूर शाखेच्या वतीने समाजातील दहावी बारावी तसेच स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे पार पडला. यावेळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते कै. राजा माने यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथमता होलार समाज बांधवा तर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले संदेश भीमराव जावीर तसेच त्यांचे बंधू विशाल जावीर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने समाजातर्फे विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संदेश जावीर यांनी गौरव पर भाषण करताना समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षेत यश कसे संपादन करावे त्यासाठी लागणारी गुणवैशिष्ट्ये कोणती आहे . या पदापर्यंत जाण्याकरिता त्यांनी घेतलेले अपार कष्ट, प्रयत्न, जिद्द चिकाटी, सातत्य, हेच माझ्या यशाचे गमक असल्याचे सांगितले. तसेच विशाल जावीर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले दहावी व बारावी नंतरचा काळ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याने विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्याकरता आपली ध्येय निश्चित करून परिस्थितीची जाणीव ठेवून त्या दृष्टीने अथक प्रयत्न केले पाहिजेत तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. सातत्यपूर्ण कष्टाशिवाय यशाला पर्याय नाही असे मनोगत व्यक्त केले. तसेच होलार समाजाचे राष्ट्रीय सरचिटणीस हैदर केंगार गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही. तेव्हा या स्पर्धेच्या युगात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर यशस्वी महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून कोणत्याही अडचणी न सांगता त्याला सामोरे जाऊन जिद्दीने कष्ट करण्याची तयारी ठेवून प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल असा संदेश गुणवंत विद्यार्थ्यांना दिला. तदनंतर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आजपर्यंत होलार समाजातील जे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून यश संपादन करून विविध उच्च पदावर कार्यरत असलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती दिली ते म्हणाले समाजातील गुणवंत विद्यार्थी घडवायचे असेल व लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचे असेल तर आपल्या समाजातील माता भगिनींनी अंधश्रद्धेची कास न धरता , शिक्षणाची कास धरावी लागेल तरच आपला समाज सुधारणार आहे प्रगती होणार आहे अन्यथा प्रगती होणार नाही. ते पुढे भाषणात म्हणाले माझा समाजातील श्रद्धेला विरोध नाही पण अंधश्रद्धेला नक्की विरोध आहे समाजातील पालकांनी आपल्या पाल्याला व समाजातील विद्यार्थ्यांनी कर्मकांडाच्या मागे न लावता महापुरुषांच्या आदर्शाचा अभ्यास करावयास भाग पाडावे व आपले ध्येय निश्चित करावे तरच आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थी जीवनात यशस्वी होईल प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी प्रयत्न याची कास धरावी कारण शिक्षण हेच समाजवृद्धीचे मूळ असून शिक्षणाची कास धरल्यास निश्चित समाजातील गुणवंत विद्यार्थी उच्च पदावर गेल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे . तसेच समाजातील कोणत्याही विद्यार्थ्यास कसलीही शिक्षण घेण्यास अडचण आल्यास मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही फक्त एक फोन करा तुम्हाला मदत मिळेल पण सातत्य सोडू नका आम्ही सर्व होलार समाज बांधव आपल्या पाठीशी आहोत असे त्यांनी आपल्या भाषणातून आव्हान केले आणि समाजातील जो कोणी विद्यार्थी आयएएस परीक्षा उत्तीर्ण होईल त्याच्या गळ्यात एक लाख रुपये नोटांचा हार घालून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल. असे आवाहन केले हे समाजातील एक तरी गुणवंत विद्यार्थी आयएएस व्हावा हे माझे स्वप्न आहे. समाजातील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यां नक्कीच आयएएस होण्याचा प्रयत्न करतील. असे मनोगत व्यक्त केले .आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला शुभेच्छा दिल्या.
यानंतर समाजातील समाजसेविका सौ लताताई जावीर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व म्हणाल्या जेव्हा यशस्वी विद्यार्थी समाजाच्या जातीच्या दाखल्यावर उच्चपदस्थ जातात तेव्हा समाजाकडे पाहण्याचा विसर पडतो असे न करता आपण समाजाचे देणे लागतो समाजाचे आपल्यावर काही ऋण आहेत म्हणून समाजाची भावी पिढी घडविण्यकरता नेहमी मोलाचे मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली
तसेच समाजातील राष्ट्रीय अध्यक्ष माजी शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर जावीर यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले या स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही पण विद्यार्थ्यांनी सतत सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते. विद्यार्थ्यासोबत पालकांची तेवढीच जबाबदारी आहे आपण विज्ञान व तंत्रज्ञाना तील विविध उपकरणांचा वापर करत असताना पालकांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडिया व मोबाईल तसेच टीव्हीपासून दूर ठेवल्यास निश्चितच शैक्षणिक प्रगती होईल व गुणवंत विद्यार्थी घडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नक्की समाज परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा सल्ला दिला.
याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड ज्ञानेश्वर भडंगे ,सौ प्रतिभाताई केंगार, तानाजीराव भडंगे, पांडुरंग गेजगे, मारुती जावीर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग हेगडे गुरुजी तसेच संघटनेचे राज्य अध्यक्ष नंदकुमार केंगार राष्ट्रीय राज्य संघटक मधुकर भंडगे अँड ज्ञानेश्वर भडंगे,अँड शिवाजी कांबळे, अँड अक्षय केंगार तानाजीराव भडंगे, लताताई जावीर, प्रतिभाताई केंगार ,सुभाष भडंगे, भाऊसाहेब गेजगे, बालाजी केंगार, मिलिंद भडंगे, डाँ दत्ता केंगार , डॉ . क्षितिज भडंगे, ॲड एन एन भडंगे,संजय हेगडे (सर) ,नेताजी भडंगे धनाजी आयवळे आदी मान्यवरांची उपस्थिती राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष पांडुरंग गेजगे यांनी केले सूत्रसंचालन मारुती जावीर सर यांनी केले आभारप्रदर्शन शहराध्यक्ष सचिन गुळग यांनी मानले सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभाकर आयवळे श्रीराम गेजगे मस्तान ढोबळे बालाजी गेजगे संदीप कोडगर बबन आयवळे ,स्वप्निल कांबळे आदी होलार समाज बांधवांनी परिश्रम घेतले बलभिम आयवळे , विलास जावीर सचिन हेगडे सोमनाथ आयवळे वसंत गेजगे मंगलताई गुळग कमलताई गेजगे बापूदादा ढोबळे क्षितीज भडंगे सत्यवान जावीर आदी समाज बांधव उपस्थितीत होते.