पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना फक्त एक रूपयात भरण्याची प्रकीया सुर असून या योजनेस शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पिकांसाठी आता एक रूपयात पीक विम्याच्या माध्यमातून पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे.
परंतू पिकविम्यासाठी ऑनलाईन अपलोड करतेवेळी सर्वर डाऊन असल्यामुळे अनेक शेतकरी बांधव पिकविम्याच्या नोंदणीपासून वंचित राहत असल्यामुळे मंगळेवढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मा.आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे यापीकविम्या संदर्भातील त्रुटी दुरू करण्यासाठी मागणी केली.
सदर पिक विम्याची मुदत ही 31 जुलै रोजी संपणार असून तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांची नोंदणी पुर्ण होऊ शकणार नाही. त्याअनुषंगाने काल कृषीमंत्री मा.ना.श्री.धनंजय मुंढे व तालुक्यातील अधिकारी यांच्याशी फोन व्दारे चर्चा केली. पिकविम्याचे अर्ज अपलोड होण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्यामुळे व सर्वर डाऊन असल्या कारणाने शेतकरी बांधवांच्या नोंदी पुर्ण होऊ शकत नाहीत. यासाठी पीकविम्या संदर्भातील अडचणी दुरू कराव्यात व मुदत वाढ मिळणेसाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना द्याव्यात अश्या पध्दतीची मागणी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी मं त्रीमहोदय यांना केली.
त्याअनुषंगाने पंतप्रधान पीकविमा योजना सर्व सामान्य शेतकरी बांधव व शेवटच्या घटकांतील शेतकऱ्यांपर्यत नोंदणी घेण्याच्या सुचना मंत्रीमहोदय यांनी अधिकाऱ्यांना केले असल्याची माहिती मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.