सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला, वाणिज्य,विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रविशंकर कुंभार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार , हायस्कूलचे पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे , ज्येष्ठ शिक्षक गणपती पाटील,राजेंद्र मुलगे उपस्थित होते.
प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत नव्याने प्रविष्ट होत असलेल्या २२९ विद्यार्थ्यांचा व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी या स्वागताने नूतन विद्यार्थी भारावून गेले होते. नव्या मित्र मैत्रिणीमुळे विद्यार्थी आनंदीत दिसत होते.
यावेळी माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्न करण्याची गरजेची आहे.आपले भविष्य आपल्याच हातात आहे.आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत.आपल्याला आपल्या परिस्थितीची जाणीव असायला हवी.आईवडिलांचे नाव लौकिक होण्यासारखे कार्य करावे. प्राचार्य रविशंकर कुंभार म्हणाले, महाविद्यालयात आपल्याला सर्व सुख सुविधा उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांची प्रगती हिच महाविद्यालयाची प्रगती असणार आहे.गुणवत्ता वाढीसाठी सर्व प्राध्यापक मनापासून प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक उपक्रमात सहभाग घेण्याचा आवाहन केले. मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार म्हणाल्या,या महाविद्यालयात यशाची परंपरा आहे.हि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकांनी योगदान देणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. स्वतःचे व पालकांचे नाव लौकिक करावे.
कार्यक्रमास प्रा.राजश्री स्वामी, प्रा.गीता चव्हाण,प्रा.प्रज्ञा धुमशेट्टी, प्रा.अमरनाथ दुस्सा, प्रा.दिपक नरोणे , प्रा. चंद्रकांत पाटील,प्रा. पिरप्पा अंबारे, प्रा.महेश नराल,प्रा. शांतेश करजगी आदी प्राध्यापक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंगद तोरणे यांनी केले तर प्रा. विद्या चिक्काळे यांनी आभार मानले.

