पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर बाजार समितीच्या आवारातील शेतकऱ्यांच्या मालकीचे भाजीपाल्याचे व फळांचे सौदे चांगल्या पद्धतीने घेतले जातात फुलाचे निलाव मार्केट यार्डात आणावे अशी सर्व शेतकरी बांधवांची विनंती आहे.
तसेच शेतकऱ्यांनी आणलेल्या फुलाचे निलाव मार्केट यार्डात करावे ही शेतकऱ्याची मागणी आहे तसेच फुलाचे दर किलोवर करावे अशी मागणी आम्ही शेतकरी वर्गाकडून वेळोवेळी केली जात आहे 10 ऑगस्ट पर्यंत फुलाचा बाजार मार्केट यार्डत सुरू करावा अन्यथा आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 15 ऑगस्ट ला बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील.
यावेळी निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पवार, बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब पवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव आटकळे उपस्थित होते.