वर्धा प्रतिनिधी
आम आदमी पार्टी च्या नुकतीच संपूर्ण महाराष्ट्र कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. वर्धा आम आदमी पार्टी च्या अंतर्गत व जातीय राजकारण ला कंटाळून अनेक नेते आणि कार्यकर्ते पार्टी ला ०६ महिन्या मध्ये सोडून गेले आहे. त्यात आणखी एक भर पडली आहे. युवा आघाडी तालुका संयोजक आणि सावंगी मेघे सर्कल चे प्रमुख अरविंद शेंडे यांनी समतानगर येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पवन तिजारे जिल्हा समन्वयक वर्धा जिल्हा यांच्या हस्ते प्रवेश केला.
मला माझ्या परिसरातील जनतेची सेवा आणि प्रश्न मांडण्याची संधी दिली जात नव्हती. आणि आप वर्धा ची टीम महापुरुष आणि मुख्यत्वे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन फक्त राजकारण करीत असल्याचा आरोप अरविंद शेंडे यांनी केला आहे. K चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या दलित समाजासाठी केलेले कार्य ला प्रेरित होऊन भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश घेतल्याचे सांगितले.
या वेळी अध्यक्षीय भाषण पवन तिजारे यांनी केले. तसेच मुख्य अतिथी म्हणून माजी नगरसेवक आसिफ शेख, वर्धा समन्वयक आकाश सुखदेवे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला गजू भगत, दुर्गादास ठमके, ताराचंद वाघमारे, दीपक काळे, शुभम डोंगरे, इंद्रपाल पाटील, सुभाष गोडबोले, निलेश शेंडे, नागदेवते साहेब हे प्रामुख्याने उपस्थित होते.