सोलापूर विशेष प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले आहेत.
*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे व करत आहे राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर व जटील होत असून राज्य सरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडलं असून पत्रकारांना आता रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत असं परखड मत व्यक्त सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकार सुरक्षा समितीने नेहमीच राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावली असून राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी प्रयत्न करत असल्याचे आवर्जून सांगत पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर गंभीर असून पत्रकारांचे प्रश्न सोडवल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी यावेळी दिली असून पत्रकारांच्या प्रश्नावर आपण लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.