सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज ३५०वा राज्याभिषेक सोहळानिमित्त हा दिवस एकदम अनोख्या रीतीने साजरा करायचा हेतूने मागील एक अठवड्या पासून ही सगळी तयारी चालू होती. महाविद्यालयापासून काही अंतरावर भटक्या जमातीचे लोकं राहतात तर त्यांच्या साठी आपल्याला काय करता येईल ह्या विचाराने महाविद्यालयातील रॉबिन हूड आर्मी मध्ये कार्य करीत असलेल्या किशोर कलबुर्गी या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये एक मेसेज फॉरवर्ड केला होता. ज्या मध्ये राज्याभिषेक दिना निमित्त धान्य जमा करा आम्ही गरजुंपर्यंत पोच करू असा आवाहन केले होते. तर तो संदेश पाहून प्राचार्य शंकर नवले, प्राध्यापक बालाजी बेद्रे,अमित कांबळे ,प्राध्यापिका सविता कोंडा, आणि विद्यार्थ्यांमध्ये नाव न सांगण्याच्या अटीवर राबवलेल्या उपक्रमामध्ये धान्य देण्याचे ठरविले.
सदर प्राप्त धान्य हे १५१ किलो होते ज्या मध्ये गहू, तांदूळ, मुगडाळ, साखर, गूळ, आणि तेथील लहान मुलांसाठी लाडू आणि बिस्कीट होते. विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या धान्याचं १२ बॅग ऑफ होप (किट) बनवले. ज्या मध्ये तांदूळ, गहू, साखर, गूळ आणि डाळ होते. ते बॅग ऑफ होप नजिक च्या भटक्या जमाती च्या लोकांच्या वस्ती मध्ये वाटले. हा उपक्रम यशस्वी करण्या करिता बाळकृष्ण शिंदे, मंगेश जवळगे, चेतन गुडेली, सचिन वाघमारे, सचिन घोळवे, पंकज शेटे, काशिनाथ अंबिगर, आकाश राठोड, अजित अडसूळ, संदीप सुभेदार, बालाजी पाटील, श्रीविद्या गुत्ती, श्रावणी नवले, सृष्टी नवले, जन्हवी बारस्कर, अल्फिया शेख, किशोर कलबुर्गी आदींनी परिश्रम घेतले.