वाडी कुरोली प्रतिनिधी
इथं विकासाचा एक वेगळाच पॅटर्न बनलाय! तो म्हणजे 'कारखाना चालवणारा माणूस' इथं बंद असलेला साखर कारखाना कसा चांगला चालवला जाईल आणि शेतकरी, कामगारांना प्रामाणिकपणे न्याय देता येईल हाच विचार प्रत्यक्षात आणला जातोय.असे मत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी पाटील म्हणाले,कुणी काहीही ठरवू द्या पण शेतकरी सभादांच्या मनात जे ठरतं तेच होतं! स्व.वसंतदादा काळे यांच्या स्मृतीस अभिवादन करून विचार विनिमय बैठकीस सुरूवात झाली.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी बाबत वाडीकुरोली येथे शेतकरी सभासद यांच्यासोबत विचार विनिमय बैठकीत परिवर्तनाची नांदी दिसून आली. उत्स्फूर्त प्रतिसाद!
सभासद बांधवांनी पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत श्री विठ्ठल कारखान्याच्या शेतकरी सभासद व कामगार यांचा जसा कारभार पारदर्शक केला तशाच प्रकारे सहकार शिरोमणी कारखान्याचा कारभार करण्यात येईल असे अभिजित पाटील यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ सभासद, शेतकरी बांधवासह, विविध संघटनेचे पदाधिकारी, तरूण वडीलधारी मंडळी, सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.