पंढरपूर प्रतिनीधी नंदकुमार देशपांडे
हरिभाऊ ज्ञानोबा उगले डोंगरगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तीन वर्षापासून मी हे गाडगेबाबांचे काम करत आहेत .
यावेळी उगले म्हणाले,36 जिल्हे 50 तालुके 500 गाव 35 शाळा एवढा माझा प्रवास झाला आहे.जशी सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली तशी आज प्रत्येक गावात शाळेच्या दोन मजली इमारती उभे राहिल्या त्यांचा हेतू साध्य झाला तसं हे गाडगेबाबांचे काम नाही झाले हीच मला खंत वाटली आणि मी कामाला सुरुवात केली सगळे नोकरवर्ग छत्तीस वर्ष सर्विस करतात मी 40 वर्ष शेतीत सर्विस करून रिटायर झालो आणि आता हे गाडगेबाबांचे काम करतोय माझे घर परिसर अंगण स्वच्छ सुंदर आहे इथूनच माझ्या कामाला सुरुवात झाली.
उगले हे आजही स्वच्छतेच्या कामाबाबत आग्रही असतात त्यांचे जिद्द वाखण्यासाठी असून त्यांचा एकच ध्यास आहे गाव परिसर स्वच्छ व्हावा असे त्याने बोलताना सांगितले.