वर्धा प्रतिनिधी
भारत राष्ट्र समिती, वर्धा ची स्थानिक सेलू तालुका येथे झालेल्या बैठकीत अनेक बाबीवर चर्चा आणि मंथन करण्यात आले.महेश मुडे यांनी उपस्थिताना विस्तृत प्रमाणात तेलंगणा मॉडेल समजवून सांगितले.
तसेच महाराष्ट्र च्या राजकारण साठी आणि शेतकरी, सर्वसामान्य च्या हितासाठी महाराष्ट्र ला BRS पक्षाची का गरज आहे याचे चिंतन या बैठकीत जिल्हा समन्वयक अजय उर्फ पवन तिजारे यांनी मांडली.
त्यांच्या स्पष्ट आणि सडेतोड विचारांनी प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस च्या अनेक पदाधिकारी यांनी BRS पक्षा मध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊन पक्ष प्रवेश घेतला.
यात प्रामुख्याने कल्पनाताई गहरोळे, रा.काँग्रेस महिला अध्यक्ष सेलू तालुका, अजिंक्य सावरकर विद्यार्थी आघाडी तालुका उपाध्यक्ष, अमोल दूधकोर तालुका सचिव, रजा शेख सेलू शहर अध्यक्ष विद्यार्थी आघाडी, करण चव्हाण, बादल सहारे, आयुष डोंगरे, सौरव बावणे शहर उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी यांनी उत्साहाने प्रवेश घेतला.
या कार्यक्रमाला सेलू तालुका युवा नेतृत्व अमित कावळे, वर्धा चे माजी नगर सेवक आसिफ शेख, प्रख्यात वक्ता महेश मुडे, वर्धा विधानसभा समन्वयक आकाश सुखदेवे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे संचालन नंदू मून यांनी केले. या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समिती चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.