काम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचा माजी उप सभापती पांडुरंग वारुंगसे यांचा आरोप
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
महाराष्ट्र शासनाचा ड्रिम प्रोजेक्ट मानल्या जाणार्या समृद्धी महामार्गावरील काम सुरु असलेला पुल काम सुरु असतानांही कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
घोटी ते सिन्नर रस्त्यावरील बेलगाव तर्हाळे या गावानजीक असलेल्या गांगडवाडी येथे हा पुल कोसळला आहे.
दरम्यान सदरचा पुल कोसळण्यामागे घाईने काम करण्याचे व ते सुमार दर्जाचे करण्याचे महत्त्वाचे कारण कारणीभुत आहे असा आरोप ईगतपुरी पंचायत समितीचे माजी उप सभापती पांडुरंग मामा वारुंगसे यांनी प्रसार माध्यमाशीं बोलतानां दिला आहे.