पंढरपूर विशेष प्रतिनिधी
सध्या पंढरपूर शहर, ग्रामीण व तालुका या ठिकाणी अवैध धंदे दारू मटका जुगार खेळणे जोरात चालू असून पंढरपूर पासून जवळच असलेल्या 2 किलोमीटर अंतरावरील लक्ष्मी टाकळी येथील मारुती मंदिरा लगतच गावठी दारूचा धंदा खुले आम सुरू आहे.
येथे येणारे तळीराम आधी दर्शन मारुतीरायाचे घेतात मगच दर्शन मदिरालयाचे घेतात असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही या मारुती मंदिराजवळील गावठी दारू धंदा कायमस्वरूपी बंद करावा असा ठराव ग्रामपंचायतीने करून तो दारूबंदी अधीक्षक ग्रामीण पोलीस अधीक्षक जिल्हा तसेच तालुका पोलीस निरीक्षक यांना पाठवला आहे .
पण या सर्वांनी या ठरावाला केराची टोपली दाखवून कायद्यापेक्षा काय द्यायचे यालाच महत्त्व दिल्याने हे अवैध धंदे जोमाने चालू आहेत. काही दारू धंद्याच्या पासून 15 ते 20 फूट अंतरावर कोचिंग क्लासेस, शाळा असून याचेही भान कायद्याच्या रक्षकाला नसून याबाबत लेखी निवेदन देऊन सुद्धा त्या निवेदनाची दखल गंभीरपणे न घेता थातुर मातुरपणे कारवाई केल्याचा भास निर्माण करून या ठिकाणी चालू असलेल्या गावठी धंद्याचा तथाकथित मालक हा अर्ज दिला तरीही पोलीस माझे काही करू शकत नाहीत. कारण त्यांचे हात कायद्यापेक्षा काय द्यायचे याने बांधले आहेत. असे मस्त वाल पणे बोलताना या भागातील नागरिकांची चर्चा झाल्याचे समजते.
वास्तविक पाहता या अगोदरचे ग्रामीण पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी जिल्ह्यातील काही भागात गावठी दारू धंदे उध्वस्त करून त्याचा बिमोड करून ते विकणाराना प्रवाहात आणून वेगळा प्रयोग केल्याने त्यांचा गौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. असे असताना केवळ कायद्यापेक्षा फायद्याचे पाहणाऱ्याने त्यांच्या या परिवर्तनाला एक प्रकारे खीळ तर घातली नाही ना अशी चर्चा सध्या सर्वत्र चालू असून पंढरपूर शहरात , गल्लीबोळ, महत्वाची ठिकाणी मटका दारूबंदी क्लब जोमाने कोठे चालतात कोण चालवते याची उत्तम बातमी कायद्याचे रक्षण करणाऱ्यांना असून सुद्धा केवळ कायद्यापेक्षा काय द्यायचे याकडेच अधिक कल असून जर एखादा प्रामाणिक अधिकारी व कायद्याचे रक्षक कारवाई करण्यास धजावत असेल तर या अवैध धंदेवाल्यापर्यंत कारवाई करणार असल्याची वार्ता लगेच पसरते. कायद्याच्या रक्षण खात्यातीलच सूर्याजी पिसाळाची भूमिका बजावणारे अधिकारी असल्याने ज्यावेळेस पोलिस धाडी टाकायला जातील त्यावेळेस मात्र हाती काही लागत नसल्याच्याही चर्चा राजरोसपणे सर्वत्र चालू आहेत .
सध्या पंढरपुरात अवैद्य धंदे वाढल्याने अन कमी पैशात जास्त मोबदला मिळत असल्याने काही मुले हाताला काम नसल्याने या अवैध्य व्यवसायाकडे वळले असून काही भागात तर शाळकरी मुलांना ही या मटक्याचे वेड लागल्याचे दिसून येत आहे. तरुण पिढी वाम मार्गाला लागून आयुष्य बरबाद होत असताना सुद्धा थोडीशी सुद्धा चाड कायद्याचे रक्षण करणाऱ्यांना नाही.असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. शहरात तालुक्यात ग्रामीण भागात जुगाराचे क्लब मटका घेण्याचे ठिकाणे ही या कायद्याच्या रक्षकाना ज्ञात असून जर आपले हात ओले झाले नाहीत तर हेच हात या अवैध व्यवसाय करणाऱ्या वर कारवाई करण्यास सुरुवात करतात असे असताना मात्र याकडे पोलीस खात्याचे दुर्लक्ष असून याच अवैद्य व्यवसायातून अनेक वेळा अनर्थ घडल्याच्या घटना पंढरपूर शहर व ग्रामीण भागात झाले आहेत.
याकडे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तीर्थक्षेत्र म्हणून होणाऱ्या पंढरी नगरीतील व पंढरपूर शहरापासून 2 अडीच किलोमीटर असणाऱ्या गावातील अवैध धंद्याचा नायनाट करणे गरजेचे आहे. कारण दारू मटका गावठी दारू विकणारे इतके निरडवलेले आहेत की काही नाही तर आपला व्यवसाय मंदिरात चालू केला आहे. कायद्याचा वचक राहिलाच नसून काय द्यायचा वचन असल्याने धंदे बोकाळले आहे. याबाबतचा ठराव देखील करून सुद्धा पोलीस खात्याने व दारूबंदी अधीक्षकाने गंभीरपणे दखल घेतली नाही. याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे कारण या सर्वांना कायद्यापेक्षा काय द्यायची पडल्यानेच हे गावठी दारू धंदे सुरू आहेत.
काही दिवसापूर्वी रेल्वे स्टेशन म्हणजे असलेल्या दारू धंद्यावर 4 बिहारी कामगार दारू पिऊन नशेत धुंद असल्याने व मारुती मंदिराजवळच आसरा घेतल्याने त्यांना या अवैद्य दारू धंदा चालवणाऱ्यांनी हाकलून दिल्याने जवळ असलेल्या रेल्वे रुळावर जाऊन बसल्याने व दारूच्या नशीब धुंद असल्याने मिरज कडून पंढरपूर कडे येणाऱ्या रेल्वेने हॉर्न वाजवून देखील त्यांना हॉर्नचा आवाज दारूच्या नशीब धुंद असल्याने ऐकू न आल्याने 03/08/2022 रोजी हे 2 कामगार जागीच रेल्वेच्या धडकेत ठार झाले. तर तिसऱ्याचा सोलापूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला याबाबतची तशी नोंदही पंढरपूर रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशन कडे असल्याचे समजते.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून असे असताना सुद्धा मारुतीच्या मंदिरा जवळचा व रेल्वे रुळा लगतच अवैद्य गावठी धंदा आजही चोरून चालू आहे. शहरालगतच्या लक्ष्मी टाकळी येथील ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळीतील अवैद्य दारू धंदे बंद करावेत असा ठराव करून दारूबंदी अधीक्षक व जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांच्याकडे पाठवला आहे. आता पोलीस खाते काय कारवाई करते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.