सोलापूर आकाशवाणी केंद्रामध्ये “मन की बात ‘च्या विशेष १०० व्या भागाचे प्रसारण
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
भारतीयांच्या मनामध्ये मन की बातच्या सलग १०० कार्यक्रमामुळे विश्वास निर्माण झाला आहे. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामन्याशी नाते निर्माण केले आहे. सकारात्मक विचार तयार होण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आज येथे केले.
सोलापूर आकाशवाणी केंद्र आणि केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने मान्यवरांसाठी आयोजित केलेल्या मन की बातच्या विशेष १०० व्या प्रसारणाच्या वेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी उत्तराखंड राज्याचे आरोग्य, सहकार आणि शिक्षण मंत्री डॉ धनसिंग रावत, उत्तराखंडाचे खासदार नरेश बंसल, आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख राजेंद्र दासरी, सहायक अभियंता अर्चिता ढेरे,क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, वरिष्ठ उदघोषक अभिराम सराफ, प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे, अनिता माळगे, पांडुरंग दिड्डी, प्रशांत धत्तुरगावंकर, संतोष पवार, क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, नितीन बनसोड आणि दिलीप मिसाळे उपस्थित होते.