सोलापूर प्रतिनिधी
सध्याच्या काळात आपली आहार संस्कृती लोप होत असल्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे. असे मत डॉ.माकम यांनी मांडले.
रविवार दिनांक 23 एप्रिल रोजी श्री. बृहन्मठ होटगी संस्थेच्या श्री. मद्वीरशैव गुरुकुल संस्कृत पाठशालेतर्फे आयोजित केलेल्या अर्चकत्व व पौरोहित्य शिबिरातील जंगम बटूंना मार्गदर्शन करताना डॉ.माकम बोलत होते. प्रारंभी होटगी संस्थेतर्फे डॉ. माकम यांचा संस्थेचे सचिव श्री.स्वामी एस जी सर यांच्या हस्ते यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आले.यावेळी डॉ.मा.श्री राजीव मठ यांचे स्वागत तर सत्कार करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव स्वामी एस.जी सर, प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी,वेदमूर्ती परमेश्वर शास्त्री हिरेमठ,वेदमूर्ती शांतु स्वामी सर,वेदमूर्ती सागर स्वामी सर, वेदमूर्ती पंडित स्वामी सर, श्री.यमनप्पा होटगोंड सर, महादेव पुजारी सर, ओंकार मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक शांतु स्वामी सर यांनी केले.
यावेळी डॉ.माकम म्हणाले" सामाजिक शारीरिक मानसिक आध्यात्मिक सुस्थिती म्हणजेच उत्तम आरोग्य होय, सुदृढ आरोग्य निर्माण होण्यासाठी माता,पिता,गुरू यांची प्रेरणा, व मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. विविध क्षेत्रातील चांगले विचार शोधून ते आचरणात आणल्यास व शांतचित्ताने जीवन जगल्यास उत्तम आरोग्य व मन तयार होते, शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरुस्त, सध्याच्या काळातील शॉर्टकट,फास्ट फूड मुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य बिघडत आहे. आपल्या आहारात फळे,फळभाजी, पालेभाज्या, दूध ताक, मोड आलेले कडधान्ये इत्यादीचा आहारात समावेश असावा.याशिवाय ध्यानधारणा व उत्तम व्यायामाची गरज आहे.असेही म्हणाले.
यावेळी जंगम बटूंना सचिव श्री.स्वामी. एस.जी सर यांनीही मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार सागर स्वामी सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समस्त शास्त्री गण व भक्तगणांचे सहकार्य लाभले.