उदय वाघवणकर जोगेश्वरी प्रतिनिधी
१२ ते २५ वयोगटातील मुलांवर काळाने झडप घेतली.पुण्याहून मध्यरात्री सुमारे ०१.३० ते २.०० च्या सुमारास निघालेली ढोल - ताशा पथकाची लक्झरी बस पहाटेच्या सुमारास 0४ ते ०४.१५ दरम्यान खंडाळा ते खोपोली दरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या शिंग्रोबा घाट उतरताना (बोरघाट) मध्ये जवळजवळ २०० फूट दरीत कोसळली.
या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २८ जण जखमी असल्याची माहिती मिळाली.हे जवळजवळ सर्व प्रवासी संतोष नगर, नागरी निवारा परिषद गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे राहणारे आहेत.यातील मृत व्यक्ती कु. यश सुभाष यादव (वय १७ वर्ष), कृतिक संजय लोहित (वय १६ वर्ष) या दोघांचे शव एका दिवसासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आले होते.नंतर ते ओळख पटवून त्यांच्या कुटुंबायांना देण्यात आले.
या अपघातातील कु. शुभम गुडेकर (वय १५ वर्ष), दीपक विश्वकर्मा (वय २१ वर्ष), तुषार गावडे (वय २२वर्ष ) हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार घेत असून आमदार रविंद्र वायकर यांनी या जखमींची भेट घेऊन रुग्णालय प्रशासनाला त्यांच्यावर व्यवस्थित व विनामूल्य सर्व उपचार करण्याचे आदेश दिले.यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना माने व डॉ. प्रसाद लोखंडे यांनी आमदार रविंद्र वायकर सर्व माहिती दिली.
यावेळी शिवसेना विभाग संघटक विश्वनाथ सावंत, बाळा नर ( मा. नगरसेवक), शाखाप्रमुख मंदार मोरे, बाळा तावडे, शाखा समन्वयक उमेश कदम तसेच अभिषेक पाटील, रोहिदास मोरे, राजन साळवी, स्नेहा हत्तरकी, वैभव सावंत उपस्थित होते.