भिवंडी प्रतिनिधी
भिवंडी येथील मौजे कैलासनगर वळपाडा येथील वर्धमान कंपाऊंड येथे आज दुपारी इमारत कोसळली. रात्री उशीरा या दुर्घटनास्थळाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
भिवंडीतील या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. दुर्घटना घडल्यानंतर काही तासांतच मदतकार्य सुरू झाल्यामुळे काही जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं. जखमींवर भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसाला ५ लाख रुपयांची शासकीय मदत तर जखमींवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येणार आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी भिवंडीतील अतिधोकादायक अवस्थेतील इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करून त्यातील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करावे असे आदेश दिले. अशा दुर्घटनांवर समूह पुनर्विकास हाच एकमेव मार्ग असल्याने त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आदेश भिवंडी मनपा आयुक्तांना दिले आहेत.असेही शिंदे म्हणाले.
भिवंडीत इमारत दुर्घटना वारंवार घडत असल्याने येत्या पावसाळ्यापूर्वी एनडीआरएफची टीम ठाण्यात मुक्कामी ठेवावी जेणेकरून अशी दुर्घटना घडल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता येईल. याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांच्या प्रकृतीची रुग्णालयात जाऊन विचारणा केली. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या प्रिन्स आणि प्रेम या लहानग्या मुलांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मी डोक्यावर हात ठेवताच लहानग्या प्रिन्सला अश्रू अनावर झाले. यावेळी त्याला धीर देत 'मी तुझ्यासोबत आहे काळजी करू नकोस'.. असे सांगत शिंदे यांनी त्याचे अश्रू पुसले.
यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा