अकलूज प्रतिनिधी
मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचे थेट प्रक्षेपण आ. रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत सांगोला भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाले.
यावेळी रणजीतसिंह मोहिते पाटील म्हणाले की सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिकांच्या सोबत या ऐतिहासिक १०० व्या भागाचा साक्षीदार झालो याचे समाधान शब्दात व्यक्त करता येणार नाही.
संपूर्ण राष्ट्राला संवादाच्या माध्यमातून एकाच धाग्यात अत्यंत सुंदर प्रकारे गुंफले जाऊ शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मा.पंतप्रधानांनी सुरु केलेला हा उपक्रम आहे.सातत्य ठेवल्यास कोणतीही गोष्ट साध्य होते हे या कार्यक्रमातून सिद्ध होते. देशातील जनतेशी राजकारण सोडून केवळ त्यांच्याविषयी संवाद साधत मोदीजींनी देशवासीयांचे मन जिंकले आहे. असे आ. रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले.
नवनवीन कल्पनांचा उदय, राष्ट्रविकास हा नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या संवादातूनही साधता येतो ही बाब पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून जगाला नव्याने कळाली.
हा कार्यक्रम पाहण्यास पक्षाचे पदाधिकारी,विस्तारक, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.