मारापुर प्रतिनिधी
मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या सर्व गुण संपन्न नेतृत्वामुळे मारापुर परिसरातील नागरिकांना आपल्या हक्काचा माणूस वाटू लागला आहे.त्याचे कारण म्हणजे कोणत्याही समस्येवर ते अचूक असा तोडगा काढून ती समस्या संपवतात याचा प्रत्यय वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या सत्कार समारंभ दिसून येतो.
मारापुर या छोट्याशा गावातील नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची खूप मोठी समस्या होती.त्यांनी या ग्रामपंचायतीची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या कार्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली.स्वातंत्र्यापासून प्रलंबित असलेला मारापुर-आसबेवाडी- शेलेवाडी-आंधळगाव,मारापुर-अकोला- शेलेवाडी, भागवत माने वस्ती ते मारापुर,हनुमान मंदिरासाठी निधी, दलित वस्ती सुधार योजना व तावशी- मारापुर वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा बंधारा कम ब्रिज यासाठी केलेला प्रयत्न वाकण्याजोगा आहे.
मारापुरातील युवकांना संघटित करून छोट्या-छोट्या उद्योगांना हातभार लावत असल्यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत.
सांगोला येथील ॲक्सिस डायनॉस्टिक सेंटरच्या डॉ.राहुल भागवत माने यांच्या हस्ते श्री.विनायक यादव यांचा सत्कार संपन्न झाला.यावेळी आदर्श यादव यांचाही वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मारापूरच्या माजी सरपंच सौ.रोहिणी विनायक यादव,उपसरपंच सुवर्णा अशोक आसबे,युवा उद्योजक राजकुमार यादव,विक्रम यादव, अशोक आसबे,डॉ.सत्यवान यादव,नंदकुमार आसबे,बालाजी यादव,तुकाराम यादव, अभिमान जानकर , बच्चन माने,संतोष अंकुश यादव व संतोष गांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम संतोष यादव मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.यावेळी सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार संपन्न झाला.