पंढरपूर प्रतिनिधी
सोलापूर येथून उपचारासाठी विशेष एअर ॲम्बुलन्स मधून मुंबईला दाखल केलेले अभिजित पाटील यांचे मित्र दत्तात्रय बापू नरसाळे पूर्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. या संपूर्ण काळात मनाची होणारी घालमेल व चिंता पुन्हा कधीही न करावी अशी होती.
यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले की दत्ताबापू घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने केलेला आनंद उत्सव खूप समाधान देणारा आहे. त्याचबरोबर त्यांनी माझा केलेला सन्मान ही माझ्यासाठी घरच्या सदस्यांनी दिलेली शाबासकीची थाप आहे.
मात्र मी यात फार काही मोठे केले असे अजिबात नसून मी फक्त माझे कर्तव्य पूर्ण केले, आणि म्हणूनच मला कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटते आहे.माझ्या मित्राला इथून पुढील आयुष्य निरोगी व सुख-समृद्धीचे जावो हीच सदिच्छा.असे मत अभिजित पाटील यांनी सांगितले.