मायणी प्रतिनिधी
मायणी इंदिरानगर येथे पंधरा दिवसांपूर्वी दूषित पाणी बंद करण्यात आले होते.त्यानंतर नवीन कनेक्शन साठी गेली अनेक दिवसापासून पाणीपट्टी भरून घेण्यात आली. सर्वसामान्य रोजगार करणारे नागरिकांनी पाणीपट्टी भरून नवीन कनेक्शन घेतली आहेत.
ग्रामपंचायतने गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना मेन लाईनला कनेक्शन जोडून दिले आहे .तर सामान्य माणसाला साध्या पाईप ला कनेक्शन जोडून दिले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत इंदिरानगर परिसरामध्ये वारंवार अशा घटना करत असून नागरिकांना त्रास कसा होईल ? याकडे भर देण्यात आलेला दिसत आहे.
ग्रामपंचायतने नागरिकांच्या मध्ये दुजाभाव केल्यास शिवसैनिक शांत बसणार नाही.कनेक्शन देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वरती कारवाई व्हावी.अशी मागणी शिवसनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.