ठाणे प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका मधील सावरदेव गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना जीवघेणा प्रवास करावा लागायचा.
याची तात्काळ दखल घेत महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन या मुलांसाठी 02 स्पीड बोट आणि लाईफ जॅकेटची सोय केली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करून शाळेत येण्या जाण्यासाठी करावा लागणार नाही.
त्याचबरोबर शाळकरी मुलांसोबत आणि शिक्षकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद देखील साधला तसेच मुलांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मार्गदर्शक तसेच महाराष्ट्राचे रुग्णसेवक मंगेशजी चिवटे,माजी आमदार पांडुरंग बरोरा,पत्रकार बंधू तसेच शिक्षक परिवार, सर्व मंडळींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.