सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्त आनंद मेळावा उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब होते.व्यासपीठावर प्रमुख पाहणे म्हणून दर्गनहळ्ळीचे युवा नेते महेश दादा बिराजदार साहेब, शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री गुरुमोर्ती पाटील साहेब, शरणप्पा बिराजदार सर, श्री विठ्ठल रामपुरे सर, पोलिस पाटील श्री श्रीमंत पाटील साहेब, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ सरोजिनी यारगले मॅडम , मुख्याध्यापक श्री केदार माळी सर, पर्यवेक्षक श्री रामेश्वर झाडे सर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, पालक शिक्षक संघाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते श्री. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले तदनंतर फित कापून आनंद मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे प्रमुख प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी सर यांनी केले. मुख्याध्यापक श्री केदार माळी सर व पर्यवेक्षक श्री रामेश्वर झाडे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागतपर सत्कार केले. श्री अभिजित घागरे सर यांनी आकर्षक स्टेज डेकोरेशन केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.दप्तर विना शाळा या नवोपक्रमा बद्दल महेश दादा बिराजदार म्हणाले, या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळत असते.यातूनच भविष्यातील उद्योजक घडत असतात. यानिमित्ताने सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले. प्राचार्य श्री केदार माळी सर म्हणाले, आनंद मेळावा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भांडवल, विक्री,नफा, संवाद, स्वच्छता , वस्तू मांडणी आदी विविध धडे समजतात. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबर व्यवहार ज्ञान ही महत्त्वाची असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी ३० स्टॉल मांडले होते.विद्यार्थ्यांनी भाजीपाला,समोसे,भेळ,पावभाजी,पोहे,पुरी भाजी, दालचावल, वाटाणा, गुलाब जामून , पाणी पुरी, चिवडा, शिरखुर्मा,हुरडा, फळे, भाज्या, ढोकळा, चहा, वडापाव, स्टेशनरी आदी विविध खाद्यपदार्थ विक्री केले.तीन मनोरंजन खेळांचे स्टॉल होते. आनंद मेळाव्याला मिनी जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. प्रमुख पाहुणे अतिथी,पालक, गावातील प्रतिष्ठित मान्यवर, विविध मंडळाचे युवक वर्ग, माता भगिनी, व पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी स्टॉलला भेट देऊन स्टॉल मधील विद्यार्थ्यांकडून विविध खाद्यपदार्थ खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. दक्षता समितीत श्री अण्णासाहेब सुतार सर,श्री संजय बिराजदार सर, प्रा.दत्तात्रय बिराजदार सर, श्री भानुदास राठोड सर, श्री राजमाने सर, श्री संजय पाटू सर, श्री रवि माळी सर, भिमाशंकर बिराजदार सर, श्री सुरेश घागरे सर आदींनी काम पाहिले.
आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी जवळपास१८८१५ रुपयांच्या भांडवलावर २२२६२ रुपये नफा मिळविले.एकूण नफ्याच्या टक्केवारी,स्वच्छता, व्यवहारिक संवाद व पदार्थांचे स्वाद आदी निकषानुसार स्टॉल नं-२५ सहावी अ-प्रथम, स्टॉल न-९, अकरावी - द्वितीय, स्टॉल न.८ पाचवी अ - तृतीय क्रमांक तर स्टॉल न.६ नववी अ उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले.परीक्षक म्हणून श्री प्रकाश कारभारी सर व श्री मल्लिकार्जुन गुरव सर यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी व आभार प्रा. दत्तात्रय बिराजदार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे वर्गांचे बहुमोल सहकार्य लाभले.