करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील ढोकरी येथे एका कार्यक्रमासाठी जातांना शहा,ता.इंदापूर येथून प्रवासी वाहतूक बोटीने प्रवास करण्याचा योग आला.भिवरवाडी,ता.करमाळा येथील श्रीहरी जाधव आणि मंगेश जाधव या दोन्ही बंधूंनी सौर ऊर्जेवर चालणारी ही लाँच बनवली आहे.
कोणत्याही आयआयटी इंजिनियर किंवा डिझायनर यांच्याकडून बोट डिझाईन न करता त्यांनी स्वतः ही बोट डिझाईन केली. त्यात सौर पॅनल असेंबल करून ६ एचपी मोटारवर अडीच तासांचा बॅटरी बॅकअप असलेली ही बोट चालते. सोलर पॅनल मुळे सौर ऊर्जेचा वापर होतो आहे. सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट,सीसीटिव्ही कॅमेरे ही सुरक्षा व्यवस्थाही बोटीत केली आहे. करमाळा तालुक्यातील लोकांना इंदापूर येथील पुणे सोलापुर हायवेला कनेक्ट होण्यासाठी स्वस्त दरात आणि प्रदूषणविरहित पर्याय जाधव बंधूंनी दिला आहे.
ग्रामीण भागातील तरुण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कल्पकतेने पर्यावरणपूरक पर्याय जलवाहतूकीसाठी निर्माण करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मेक इन इंडिया या उपक्रमात युवांना यासाठी प्रोत्साहन दिले जाते.जाधव बंधूंचा आम्हाला अभिमान वाटतो.या दोघांचेही मनापासून अभिनंदन केले.