पंढरपूर प्रतिनिधी
महावितरण भारतात वीज मंडळांनी पुढील 02 वर्षाकरिता वीज दरवाढ करण्याची मागणी आयोगाकडे केल्याने ही दरवाढ 2.44 रुपये प्रति युनिट म्हणजेच सुमारे 37% आहे. यामुळे अतिरिक्त बोजा हा वीज ग्राहकावर पडणार आहे.
वीज महामंडळाने जर ही दरवाढ लागू केली तर वीज कडाडणार असून ग्राहकांना 100 होल्ड चा झटका बसणार असल्याने वीज ग्राहक शेतकरी दुकानदार व्यापारी आणि जागे होणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला विजेचा शॉक बसल्याशिवाय राहणार नाही.
याकरता सर्वांनी याला विरोध करणे गरजेचे आहे. याबाबत अखिल ग्राहक पंचायत ही प्रयत्नशील आहेत ग्राहकानेही जागे होणे गरजेचे आहे आपल्या माहितीस्तव सोबत फॉर्म असून तो प्रत्येकाने भरून पाठवून वीज दरवाढीला विरोध करावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, मध्य महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा सचिव सुहास निकते तसेच अखिल भारतीय तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे व आझाद अल्लापुरकर पंढरी अंध या सदस्यांनी केले आहे .
या दरवाढीस वीज ग्राहक शेतकरी व्यापारी या सर्वांनी जर विरोध केला नाही तर वीज दर वाढीला सामोरे जावे लागणार आहे 37% वीजदर वाढी अन्यायकारक असून याला सर्वांनीच विरोध करणे गरजेचे आहे विद्युत मंडळाने होणारी विजेची चोरी याकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे कारण चोरी करणार एक जण त्याचा भुर्दंड मात्र वीज ग्राहकांना हा कुठला न्याय आहे. याकरीता वीज मंडळानेही प्रथम विजेची चोरी थांबवणे गरजेचे आहे इतर अवांतरही खर्च करणे तितकाच गरजेचे आहे या वीज दरवाडीला अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाची वरील दोन कारणे असून याबाबत वीज मंडळानेही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
वीज ग्राहकाने दरवाढीला विरोध करण्यासाठी सदरचा फॉर्म भरून त्यास विरोध करावा व होणारा बोरदंड टाळावा याकरता जास्तीत जास्त वीज ग्राहक नागरिक शेतकरी आणि आपला विरोध दर्शवावा असे आव्हान अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे.