सोलापूर प्रतिनिधी
आई-वडिलांचे नाव लौकिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाने अभ्यास करुन यशस्वी व्हावे असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी यांनी केले.
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. त्याप्रसंगी धुमशेट्टी बोलत होते. प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशुले, वर्गशिक्षक राजेंद्र मुलगे, राजकुमार मरगुरे, बसवराज तेग्गेळी आदी उपस्थित होते. याप्रसंगी धानेश्वरी अक्का,नंदिनी ममदे,प्रतिक्षा मुसळे,श्रावणी तूनकी,कोमल कुंभार,श्रद्धा शिंदे,त्रिशा माकम,शैलजा म्हैत्रे,तय्यबा भागानगरे,निकिता अजनाळकर,ओम मिस्किन, विनोद धोत्रे या विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केले.
अतिथी कुंभार म्हणाले, शिक्षकांकडून मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी भविष्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक हुल्ले म्हणाले, शिक्षकांनी दिलेल्या संस्काराचा व ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन करुन परिक्षेसाठी शुभेच्छा दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले.