पंढरपूर प्रतिनिधी
अ.भा.ग्राहक पंचायत ही ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांचे योग्य मुल्यांकन करणारी संस्था आहे असे मत पंढरपूरचे वरिष्ठ आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी व्यक्त केले. ते प्रवासी दिन समारंभात अध्यक्षपदावरून बोलत होते.
अ. भा.ग्राहक पंचायतीचेवतीने रथसप्तमी हा दिवस प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.त्याचाच भाग म्हणून रा.प.परिवहन महामंडळाच्या पंढरपूर बसस्थानकावर प्रवाशांना तिळगुळ वाटप व कर्मचारी गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल कुंभार (पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग) उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
स्वागत वाहक मोहन शिंदे यांनी केले तर प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी या ग्राहक पंचायतीच्या कामाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी प्रवासी दिनाचा हेतू विषद केला. जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांबद्दल विस्तृत विवेचन करून काही अपेक्षा व्यक्त केल्या. तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी जिल्हा न्यायालयाजवळ बसथांबा द्यावा अशी मागणी केली.
याप्रसंगी अ.भा.ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा कार्यकारणी सदस्य पांडुरंग अल्लापूरकर,तालुका कार्यकारणी सदस्य संभाजी लंगोटे,संजय खंडेलवाल,मकरंद पदमवार, सहा.वाहतुक निरिक्षक नेहतराव, शहिद कुणालगीर गोसावी अंध शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील इ. उपस्थित होते.
यावेळी अ. भा ग्राहक पंचायतीतर्फे उत्कृष्ट प्रवासी सेवा बजावणाऱ्या चालक,वाहक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रवासी ग्राहकांना रथसप्तमीनिमित्त तिळगुळ वाटप करण्यात आले, तसेच अ.भा. ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रवाशांच्या हितासाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक पंचायतीचे तालुका सहसंघटक आझाद अल्लापुरकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी स्थानक प्रमुख रत्नाकर लाड,लिपिक विजया भूमकर इ. नी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपन्न झाला.