पंढरपूर प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड पंढरपुर तालुका यांचे वतीने तहसिलदार व कृषीअधिकारी पंढरपुर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.पी.एम किसान सन्मान निधी या शेतकरी पेन्शन योजनेमध्ये त्रुटी निर्मान झालेली आहे. त्यात तात्काळ सुधारणा करावी.अन्य था आंदोलन केले जाईल अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्ता ताड यांनी दिली आहे.
अनेक शेतकर्यांना मिळणारे पैसे बंद झालेले आहेत.मृत्यु झालेले शेतकऱ्यांचे या योजनेचे वारस नोंद झालेली नाही,या योजनेत अनेक शेतकरी लाभापासुन दुर आहेत.या शेतकर्यानी जायचं कोणाकडे हा प्रश्न निर्माण झालेला आहे.शेतकरी तलाठी,तहसिलदार, कृषी अधिकारी यांच्याकडे चकरा मारत आहेत.जगाचा पोषणकर्ता शेतकरी सर्वाना अन्न पुरवतो आहे,त्याकडे शासनाला लक्ष द्यायला वेळ नाही.
शेतकरी तहसिलदार यांचेकडे गेला असता,त्यांना कृषी अधिकार्याकडे पाठवले जात आहे.कृषी अधिकार्याकडे गेले आसता ते तहसिलकडे पाठवले जात आहे.या त्रासाने शेतकरी त्रस्त झाला आहे.या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसिलदार व कृषि अधिकारी या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.दहा दिवसाच्या आत या योजनेसाठी स्वतंत्र खिडकी(टेबल)सुरू करण्यांत यावे अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यांचा इशारा देण्यांत आला.या निवेदनाची प्रत १)मा.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री २)मा.जिल्हाधिकारी सोलापुर .यांना सादर करण्यांत आले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष दत्ता ताड, विधानसभा अध्यक्ष अमोल कुंभार,सोशल मिडीया प्रमुख प्रमोद जगदाळे उपस्थित होते.शिवश्री. दत्ता ताड(अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पंढरपुर तालुका) मो.९५२७२११८४१ या मोबाईल वर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.