वाहन चालवताना स्वयंअनुशासन हे सर्वोत्तम अनुशासन - पोलीस आयुक्त राजेंद्र माने
सोलापूर प्रतिनिधी
रस्त्यावर वाहन चालवत असताना स्वयं अनुशासन हे सर्वोत्तम अनुशासन आहे. वाहन चालवताना विद्यार्थ्यांनी रस्ता वाचला पाहिजे, म्हणजेच रस्त्यावर विविध चिन्हे असतात ती लक्षात ठेवून त्यानुसार कृती केली पाहिजे. भारतात दर ४ मिनिटाला रस्ता अपघातात १ व्यक्ती मृत्युमुखी पडतो हे चिंताजनक आहे. त्यासाठी सर्वांची जनजागृती होणं गरजेचं आहे असे प्रतिपादन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी केले.
सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आयोजित ३४व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप तसेच सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा क्लब चे उदघाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक नितीन धार्मिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, सिंहगड इन्स्टिट्यूट चे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले उपस्थित होते.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008कार्यक्रमाच्या सुरुवातीला रस्ता सुरक्षा व अपघातसमयी जखमी व्यक्तींना मदतीसाठी 'बिव्हिजि' या संस्थेतर्फे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड म्हणाल्या की रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणजे फक्त एक आठवडया पुरते सतर्क राहून चालणार नाही तर हे वर्ष साजरे करायला हवे. यासाठीच महाविद्यालयात रस्ता सुरक्षा क्लब ची सुरुवात करण्यात आली आहे याद्वारे विद्यार्थ्यांना यासंबंधीची माहिती ,प्रबोधनात्मक व्हिडिओ पाठवण्यात येतील. विद्यार्थ्यांनी आता रस्ता सुरक्षेचे सदिच्छा दूत बनावे. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन, अपघातसमयी जखमींना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगितले.
यावेळी रस्ता सुरक्षा संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी केले तर सूत्रसंचालन सुझान नदाफ व ऋतुजा राऊत यांनी केले.