जैविक शेती देशाच्या हिताची- डाॅ. सुहास खांबे
पंढरपूर प्रतिनिधी
आपली जमीन समृद्ध आहे. जैविक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे आवश्यक आहे. रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्यावर जमीन नापिक बनते. शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने नियोजन करून शेती करणे गरजेचे आहे. आपल्या शेतातील पिकांशी सतत संपर्क ठेवल्यास पिकावरील रोगराई व नियंत्रण ठेवता येते.
रासायनिक खते व कीटकनाशक वापरल्याने शेतातील माती खराब होते. माती खराब झाल्याने परिणामी उत्पन्न कमी निघते. भविष्यात जैविक शेती शिवाय पर्याय नाही. यासाठी खर्च कमी उत्पन्न थोड्याफार प्रमाणात कमी असते. पण ते चिरकाल टिकते. रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केल्यावर कालांतराने त्या जमिनीत उत्पन्न घटते व जमीन नापिक बनते. जैविक शेतीचे खुप फायदे आहेत. एकाच जमीनीत वारंवार एकच पिक घेतल्यावर जमीन नापिक बनते. शेतकऱ्यांनी एकच पिक न घेतात वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेतली तर जमीन उत्तम बनते. शेती मध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची मानसिकता बदलून जैविक शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कडुलिंबाच्या पानाचे मिश्रण, गोमूञ, कडुलिंबाच्या निंबोळ्या, हिरवी मिरची, लसूण, लाकडाची राख, साबण पावडर यासारखे जैविक तंत्रज्ञान वापरून पिकावरील किडीचा नायनाट करून शकतो. जैविक शेती शेतकऱ्यांच्या व देशाच्या हिताची असल्याचे मत सांगली येथील डाॅ. सुहास खांबे यांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये बोलताना व्यक्त केले.
यादरम्यान डाॅ. सुहास खांबे, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा.
भालचंद्र केळकर, सतिश रामचंद्रे प्रा. चंद्रकांत देशमुख आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डाॅ. सुहास खांबे यांनी जैविक शेती म्हणजे काय? त्याचा उपयोग का व कशासाठी करायचा, त्याचे फायदे काय, उत्पादने याशिवाय शेतीला जोड व्यवसाय याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी प्रतिनिधी नागेंद्रकुमार नायकुडे यांनी केले और उपस्थितांचे आभार समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी मानले.