नेपतगाव प्रतिनिधी
नेपतगाव गावचे शेतकरी पुत्र विकास कदम यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील,नेपतगाव ग्रामस्थ ग्रामपंचायत तर्फे त्यांचा जिल्हा परिषद शाळा नेपतगाव येथे सत्कार केला व शाळेतील लहान मुलांना खाऊ वाटप केले त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, आपल्या कृषीप्रधान भारत देशाचा गाडा फक्त दोघांच्या खांद्यावर ओढला जातोय ते म्हणजे सीमेवर संरक्षण करत असलेले जवान आणि शेतात कापड कष्ट करत असलेल्या शेतकरी, जवान सीमेवर निधड्या छातीने देशाचे संरक्षण करत आहेत आणि शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतोय म्हणून देशातील 130 कोटी जनता सुखाने व पोठभर खाऊन आनंदाने देशात राहते, देशाला स्वातंत्र्य मिळाले होते त्यावेळी आपल्या देशातील लाखो नागरीक उपासमारीने मारत होते, स्वातंत्र्यानंतर आपल्या देशावर अनेक अतिरेकी हल्ले झाले युद्ध झाले पण प्रत्येक वेळी आपल्या देशातील जवानांनी देशाचे संरक्षण करत आपल्या रक्ताने इतिहास लिहला आहे आज आपलाच एक शेतकरी पुत्र आपला एक भाऊ सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी जात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, फौजी विकास कदम यांनी नोकरी ला गेल्यानंतर ही आपल्या गावातील तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात पूढे जाण्यासाठी मदत व मार्गदर्शन करावे अशी इच्छा ही व्यक्त केली आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने या रियल हिरो चे स्वागत केले पाहिजे.
त्यावेळी उपस्थित नेपतगावाचे गावचे प्रथम नागरिक सरपंच परकाळे ताई, ग्रामसेवक अमर मकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी गावातील शेतकरी व तरुण मोठया संख्येने उपस्थित होते शिक्षक स्टाफ विद्यार्थी उपस्थित होते