पंढरपूर प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पहिल्या वर्षांपासून केला तर यश भेटत असते. आज स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून करू शकतात. मोबाईलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले त्या योगदानातून आज मी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहे. स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना व्हटसप, इनस्टाग्राम सारख्या सोशल मिडीयात अडकू नका. यामध्ये खुप वेळ वाया जातो. तोच वेळ तुम्ही अभ्यासासाठी द्या. सद्या जागा खुप कमी असतात अन् परीक्षा देणाऱ्यांची संख्या लाखात असते. पहिल्या फेरीत यशस्वी व्हायचे असेल तर आतापासूनच अभ्यास सुरू करा अभियांत्रिकीची पदवी पुर्ण होताच तुम्हास स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या फेरीत यश मिळेल. असे मत ऋतुजा अंभगराव यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेल्या कुमारी ऋतुजा अनिल अभंगराव हिने राज्य लोकसेवा आयोग परिक्षेत "इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर वर्ग-२" पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात तिचा कौतुक सोहळा व सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कुमारी ऋतुजा अंभगराव हिचा महाविद्यालयांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान रेखा अंभगराव यांचे ही महाविद्यालयाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी बोलताना म्हणाले, गव्हमेंट साठी पॅरामिटर्स वेगळे आहेत. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत खुप महत्वपूर्ण असते. अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना कंपनी प्लेसमेंट होणेसाठीचे प्रयत्न अन् त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे हे आयुष्यात खुप चॅलेंजिंग असते. प्रचंड मेहनत घेतल्या स्पर्धा परीक्षेत यश निश्चित भेटत असते. याचे उदाहरण ऋतुजा अंभगराव आहे. वेगळ्या प्रकारच्या करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. त्या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे मत डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुञसंचलन व आभार प्रदर्शन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापु माने, प्रभाकर शिंदे, गणेश वसेकर यांनी परिश्रम घेतले.