पंढरपूर प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना सध्या चालू केली आहे.पण या महामंडळाकडून सिबिल स्कोर आणि सक्षम दोन जमीनदार या जाचक अटीमुळे मंताग समाजातील बेरोजगार युवकांना याचा फायदा आणि लाभ होत नाही.स्वत:चा व्यवसाय करण्यापासून मांतग समाजातील युवक,युवती वंचित राहण्याची शक्यता नाकरता येत नाही.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मातंग समाज हा आर्थिक दृष्ट्या कंगाल आहे.समाजातील बेरोजगार युवकांची संख्या जास्त प्रमाणात आहे.अशा परिस्थितीत राज्य शासनाकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनाच्या जाचक अटी करून सर्वसामान्य लोकांवर मोठ्याप्रमाणात अन्याय केल्यासारखे आहे.तरी लोकसंख्येप्रमाणे उद्दिष्टे वाढवून देण्यात यावीत.अशा जाचक अटी समाजातील बेरोजगार युवक आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेपासून वंचित राहिला जातोय.आणि महामंडळाच्या पोटजातीतील थेट कर्ज योजनेसाठी उद्दिष्ट प्रमाण कमी ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील जिल्हातील काही ठिकाणी मातंग समाजातील लोकसंख्या जास्त आहे त्या जिल्हाला उद्दिष्ट वाढवून देण्यात यावीत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाकडून कर्ज योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. योजनेचा लाभ समाजातील बेरोजगार युवकांना झाला पाहिजे.आणि राज्य शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून तात्काळीन जाचक अटी रद्द करून मातंग समाजाला न्याय द्यावा.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द न झाल्यास शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने महामंडळाच्या दारात अमरण उपोषणाला बसणार आहे.यांची राज्य शासनाने व विकास महामंडळ प्रशासनानी घ्यावी.असेही शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील म्हटले आहे.