सोलापूर प्रतिनिधी
विद्यार्थी दशेपासूनच वक्तृत्व कलेची आवड असावे.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी वक्तृत्व शैली विकसित होणे आवश्यक आहे.चांगला वक्ता होण्यासाठी वक्तृत्व कला आत्मसात करावे. वक्तृत्वाने स्वतः चे जीवनशैली सुधारता येते. वक्तृत्व कला ही तपश्चर्या आहे म्हणून उत्तम वक्ता होण्यासाठी वक्तृत्व कला जोपासावी असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर यांनी केले.
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पाचव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी रोडगीकर बोलत होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयकुमार हुल्ले होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी सुभाष धुमशेट्टी,मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, बाह्य परीक्षक मल्लिकार्जुन प्रशालेचे शिक्षक अनिल कुमार गावडे ,जैन गुरुकुल प्रशालेचे मिलिंद खोबरे आदी उपस्थित होते.
प्रथम तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी म्हणाले, नेताजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार सर हे महास्वामीजींच्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक विधायक कार्य करीत आहेत. महास्वामीजींचे विचार व कार्य हे समाजात पोहचविण्याचे चांगले कार्य करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजशेखर मरगुरे, षडाक्षरी हिरेमठ ,भारती पाटील , राजश्री स्वामी, बसवराज बिराजदार , शितलकुमार पाटील, मारुतीराव कांबळे, लक्ष्मीकांत त्रिशुले,प्रकाश कोरे ,चंद्रकांत पाटील , प्रशांत पटणे आदींनी परिश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वराध्याय मठपती यांनी केले तर शिवानंद पुजारी यांनी आभार मानले.