पंढरपूर प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षेक पालक मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. पाल्य व पालक यांच्यामध्ये चांगला सुसंवाद असणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या पाल्या मधील टॅलेंट ओळखून त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी नेहमीच शिक्षक आणि पालकांनी कटिबद्ध असावे. असे प्रतिपादन प्राचार्यांनी केले.
शिक्षक पालक सभेचे प्रास्ताविक कला विभागाचे प्रमुख प्रा. बी.बी. जाधव यांनी केले.. शिक्षक मनोगतात प्रा. राजाराम गोडसे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांमधील अंतर कसे कमी करता येईल हे अनेक उदाहरणांचे दाखले देत स्पष्ट केले.
पालक म्हणून जबाबदारी न झटकता मार्गदर्शकाची भूमिका पालकांनी निभवावी असे मत प्रा. निलेश खैरनार यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये कमल संजय सूर्यवंशी, डॉ. विजयकुमार मुळे विनायक सुरेश चवरे या पालकांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावरती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे पर्यवेक्षक युवराज अवताडे कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत गव्हाणे यांनी केले.
शिक्षक पालक सभेचे आभार प्राध्यापक महेश कोंडूभैरी यांनी केले.