*कै.पुष्पा नारायण दुधाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने भागवत कथेला उत्साहात सुरुवात*
*"भागवत कथा" सर्व ग्रंथाचे सार :-मा.धैर्यशिलभाऊ देशमुख*
करकंब प्रतिनिधी
कै.पुष्पा नारायण दुधाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने व कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या श्रीमत् भागवत कथेच्या वेळी राणी सिदवाडकर यांनी सांगितले.
सुरुवातीला मा.धैर्यशीलभाऊ देशमुख, मीनादेवी देशमुख, शरदचंद्र पांढरे, आदिनाथ देशमुख ,राहुलकाका पुरवत, मिलिंद उकरंडे,विजय भागवत, ज्ञानेश्वर दुधाणे गणेश दुधाणे, यांच्या शुभहस्ते आणि केदार जोशी यांच्या मंत्रोच्चाराच्या साक्षीने चौंडेश्वरी मातेची व भागवत ग्रंथाचे पूजन करुन दीपप्रज्वलन केले नंतर आदिनाथ देशमुख, शरदचंद्र पांढरे,राहुलकाका पुरवत यांनी मनोगत व्यक्त केली.
त्यानंतर जपसंकुल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की करकंब मध्ये अतिशय आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक पर्यावरण कार्यक्रम नियमित होतात,ही अतिशय चांगली गोष्ट असून या भागवत कथेचे नियोजन अतिशय सुंदर करुन या भागवत कथेच्या लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन केले,कारण भागवत कथा हे सर्व ग्रंथाचे सार आहे,तसेच श्रीराम जय राम जय जय राम नामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणखी जोमान काम करायला सांगून प्रेरणा दिली,त्यानंतर मान्यवरांच्या सत्कारानंतर करकंब गावच्या लेकीचा म्हणजे राणीताई सिदवाडकर यांचा करकंबकर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कथा ऐकायला राजा परिक्षीत आणि राणी यांचे यजमान म्हणून धनंजय इदाते व जयश्री इदाते यांनी मान स्विकारला, आणि कु.राणीताई सिदवाडकर यांच्या श्रीमत् भागवत कथेला प्रारंभ झाला,भागवत कथा का श्रवण करावी,भागवत कथेचे महात्म्य काय आहे हे सांगताना आपल्या आयुष्यात आपण घर बांधताना इंजिनिअरच सर्व ऐकतो, त्या प्रमाणे जीवन जगत असताना संसाराबरोबर संतांचे विचार आत्मसात करणं गरजेचं असून नामस्मरण आणि कथाश्रवण करण्याने संतांचे विचार ऐकल्यानंतर जीवन संस्कार संपन्न बनते,भागवत ग्रंथाची निर्मिती कशी झाली,परिक्षिती राजाने कथा कशी ऐकली आणि जीवनाचा उध्दार कसा झाला याची अनेक उदाहरणे दृष्टांत देऊन संगीतमय भागवत कथेची तल्लीनता वाढवली.
पहिलीच कथा असून देखील अतिशय सुंदररित्या मांडणी केली,गायन ही अप्रतिम साथसंगत नामदेव आघाव, ज्ञानेश्वर रहाटे,रमेश वीटे,लक्ष्मण कवडे, ज्ञानेश्वर पिसे यांच्या मुळे आणि सचिन स्पिकर्स मुळे रंगत अधिक वाढत गेली,पुढे दररोज सायंकाळी ६:३०वा चौंडेश्वरी मंदिर येथे २९डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या भागवत कथा श्रावणाचा लाभ घ्यावा तसेच परगावातील आणि ससर्व महाराष्ट्रातील भक्तभाविकांनी KD NEWS लाईव प्रक्षेपण करण्यात येत आहे तरी घरबसल्या ही लाभ घेण्याचे आवाहन ज्ञानेश्वर दुधाणे गणेश दुधाणे यांनी केले यांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय भागवत,मोहन बोधे, सचिन मुजमुले, कांतीलाल टकले, जोतीराम सिदवाडकर, देवकी दुधाणे अनुपमा दुधाणे, वैशाली चोथे,संध्या भागवत, दुधाणे परिवार आदी अधिक परिश्रम घेत आहेत