राज्यस्तरीय -तिसरा क्रमांक,पुणे विभागीय स्तर - दुसरा
(शासन निर्णय क्र.साववि-२०२१प्र क्र४१क११मंत्रालय मुंबई दि१७/११/२०२२ )
चिंचणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील प्रती महाबळेश्वर असणाऱ्या चिंचणी गावास महाराष्ट्र राज्याचा राज्य स्तरीय 3 रा क्रमांक मिळाला आहे तर पुणे विभागीय पातळीवर 2 रा क्रमांक मिळाला आहे.त्याबद्दल सर्व स्तरातून चिंचणीकरांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
याविषयी सविस्तर माहिती मोहन अनपट यांनी तेज न्यूजशी बोलताना दिली, चिंचणी आता 'वनश्री' चिंचणी खर तर आम्ही विस्थापनानंतर पुन्हा साताऱ्यासारख्या निसर्ग रम्य भागात जाऊ शकणार नव्हतो. परंतु चिंचणी मध्येच झाडांचे गाव ते मिनी महाबळेश्वर उभे करण्यासाठी गेल्या सतरा अठरा वर्षापासून या गावातील तरुण, जेष्ठ, स्त्रिया, मुले यांनी जे झपाटून झाडे लावण्याचे काम केले आणि आज या गावांमध्ये ७००० पेक्षा जास्त झाडे लावून जगवली यामध्ये फळांची, फुलांची, वनौषधी, जंगली ,सुगंधी, शोभेची आहेत.
ओसाड माळावर नंदन फुलवलं याच झाडांनी चिंचणी ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे. या सगळ्याची दखल घेत राज्य शासनाने चिंचणी गावाला 2018 चा वनश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जाहीर झालेला हा पुरस्कार प्रचंड प्रेरणादायी व अभिमानास्पद आणि केलेल्या कामाची पोचपावती देणारा आहे असे ही मोहन अनपट यांनी सांगितले.
" झाडे लावणार झाडे जगवणार "