मायणी ता.खटाव प्रतिनिधी
भारताचे प्रथम मिसाइल मैन तथा शहीद ए वतन फतेह अली खान हजरत टीपू सुल्तान(र.अ.) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . हजरत टीपू सुल्तान जयंती उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने नियमावली तथा कायदा सुव्यवस्थचे पालन करून साजरी करण्यात आली.या वेळी मुस्लिम समाजाचे प्रवक्ते मा.नावाजभाई तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितित हजरत टीपू सुल्तान यांचे प्रतिमे ला पुष्पहार अर्पण करुन खिराज ए अकीदत सादर करण्यात आली तसेच हजरत टीपू सुल्तान यांचे विचारधारेचा ऊपस्थितांना परिचय करून देण्यात आला.
मा.नावाजभाई तांबोळी म्हणाले जयंती अशी साजरी झाली पाहिजे की त्यातून काहीतरी जनसामान्य जनतेला काहीतरी आर्थिक लाभ घर उपयोगी साहित्य, शैक्षणिक साहित्य ,त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व रुग्णांना फळे वाटप असा फायदा झाला पाहिजे तरच ते जयंती झाल्यासारखे वाटेल त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने आर्थिक दुर्बल असलेल्या काही घटकांना किराणा वाटप व मेडिकल कॉलेज वरील असलेले रुग्ण त्यांना आरोग्यासाठी उपयुक्त अशी फळे नारळ पाणी देण्यात आली आहे .तरी इथून पुढे ही जयंती ही साध्या पद्धतीने इतरांना मदत होईल अशी साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावेळी रिजवाण नदाफ,झाकीर अझरुद्दीन नदाफ ,रबाज नदाफ,सलमान नदाफ ,साहिल नदाफ आलम बागवान, वसीम मुल्ला रमीज नदाफ ,साद बागवान मुवाज बागवान ,सईद बागवान साजिद जमादार, विशाल चव्हाण ,कुंडलिक वागमोडे, मंगेश भिसे, फिरोज मुलाणी,उपस्थित होते.झाकीर नदाफ यांनी आभार व्यक्त केले.