वेणुनगर पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती दि. २१.०७.२०२२ रोजी अभिजीत पाटील यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी प्रेमलताताई रोंगे यांची बहुमताने निवड होवून संचालक मंडळ अस्तित्वात आले. चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २ सिझन बंद असलेल्या कारखान्याचे कामकाज दि. २२.०७.२०२२ पासून चालू होऊन दि. २९.१०.२०२२ पासून अवघ्या ३ महिन्याच्या कालावधीमध्ये ऊस गळीत हंगाम २०२२-२३ चा शुभारंभ होऊन कारखाना चालू झालेला आहे.
कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी कारखान्याच्या सभासदांचे मागील प्रलंबित ऊसाची बिले कारखाना चालू होण्यापूर्वी वाटप पूर्ण करून कारखान्यास देखभाल व दुरूस्तीसाठी लागणारे मटेरियल त्वरीत उपलब्ध करून, ऊस तोडणी वाहतुक यंत्रणाही थोडक्या कालावधीमध्ये उभारणी करून कारखान्याचा गळीत हंगाम व्यवस्थितरित्या चालू केला आहे. आज दि.१०.११.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता १ लाख क्रशिंग पूर्ण झालेले आहे. कमी कालावधीमध्ये १ लाख क्रशिंग झाल्यामुळे कारखान्याचे सभासद, कामगार, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांचेसह मा. संचालक मंडळाने यासर्वांचे अभिनंदन केले.
येथून पुढेही अशीच कारखान्याची यशस्वी वाटचाल करून १२ लाख मे. टन ऊसाचे गाळप करण्याचे मा. संचालक मंडळाचा मानस आहे. त्यासाठी सर्व सभासद शेतकरी यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केलेले आहे.