पंढरपूर येथे देशभक्त बाबुराव जोशी व्याख्यानमाला सुरू
पंढरपूर प्रतिनिधी
मराठी सिनेमा श्रीमंत करायचा असेल तर मराठी मातीतील प्रश्न मांडले पाहिजेत,तरच प्रेक्षक मराठी सिनेमा पाहण्यास येतील,असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक,अभिनेते,लेखक श्री प्रवीण तरडे यांनी केले. दि पंढरपूर अर्बन बँक आयोजित देशभक्त बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
मराठी सिनेमा श्रीमंत करायचा असेल तर मराठी मातीतील प्रश्न मांडले पाहिजेत,तरच प्रेक्षक मराठी सिनेमा पाहण्यास येतील,असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक,अभिनेते,लेखक श्री प्रवीण तरडे यांनी केले. दि पंढरपूर अर्बन बँक आयोजित देशभक्त बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना ते कवठेकर प्रशाला येथे मराठी चित्रपटसृष्टी,या विषयावर बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन श्री उमेश परिचारक,अर्बन बँकेचे संचालक दीपक शेटे, मुन्नागिर गोसावी,हरीश ताठे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री प्रवीण तरडे पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि चित्रपट निर्माते यांची परिस्थिती एकच आहे,शेती करताना शेतकरी नफा,नुकसान याचा विचार करीत नाही तर तो निर्मितीचा आनंद महत्वाचा असतो. ध्येयप्राप्ती म्हणजे यश नव्हे तो प्रवास महत्वाचा असतो, भारतीय चित्रपसृष्टी 3 मे 1913 रोजी सुरू झाली, ती आपण म्हणजे एका मराठी माणसाने चित्रतपस्वी श्री दादासाहेब फाळके यांनी सुरू केली. पण आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. तमाशा,भावकी,विनोदी,राजकारण याच विषयात मराठी सिनेमा अडकला.मराठी मातीचे प्रश्न मांडले नाहीत,याने तो मागे पडला. सैराट,दुनियादारी,नटसम्राट, मुळशी पॅटर्न यासारख्या चित्रपटांनी ती तरली सैराट या नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमाने मराठी सिनेमा श्रीमंत झाला. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारा सिनेमा म्हणून पुणेकर प्रेक्षकांनी तो नाकारला,अखेर संपूर्ण महाराष्ट्रात तो जोरात चालल्यावर दोन आठवड्यांनी पुण्यात जोर वाढला,तो नऊ आठवड्यापर्यंत मुळशी पॅटर्न चे तिकीट मिळत नव्हते.शेतकऱ्याची पोर गुंड का झाली,याचा विचार केला पाहिजे.प्रत्येकाने आपल्या मातीचे प्रश्न मांडले पाहिजेत,आपले वास्तव मांडताना लाजले नाही पाहिजे.असे श्री प्रवीण तरडे यांनी सांगितले.
यावेळी शहरातील उत्कृष्ठ सजावट,मूर्ती,देखावा,मिरवणूक काढण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच नवरात्र उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन शांताराम कुलकर्णी यांनी केले,प्रास्ताविक श्री विशाल तपकिरे यांनी केले.यावेळी नागरिकांनी विशेषतः युवक वर्गाने मोठी गर्दी केली होती.