अकलूज प्रतिनिधी
घडशी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना देण्यात आले.
यावेळी शासनाकडे गडशी समाजाच्या प्रलंबित मागण्या चे निवेदन राज्याचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील, सोलापूर जिल्ह्याचे खजिनदार माऊली जाधव तसेच पंढरपूर शहर शिवसेना उपाध्यक्ष विनय वनारे जय हिंद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघटनेचे प्रवक्ते यांच्या हस्ते नायब तहसीलदार तोंडसे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी तोंडसे म्हणाले की,सदरचे निवेदन शासनाकडे लवकर पाठवण्यात येईल.
यावेळी तुकाराम साळुंखे पाटील म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील सर्व घडशी समाज बांधवांसाठी प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्यास समाजास हितकारक असून त्यासाठी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर पुणे ठाणे मुंबई या पश्चिम महाराष्ट्रातील घडशी बांधवांना या मागण्याचा फायदा होनार आहे.