पंढरपूर प्रतिनिधी
दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी वीज ग्राहक तक्रार निवारण दिन सुरू करावा अशी मागणी महावितरणचे अधिक्षक अभियंता सोलापूर व सर्व विभागीय अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
महावितरण तर्फे विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्यात तिसऱ्या बुधवारी "ग्राहक तक्रार निवारण दिन" आयोजित करावा. त्यामध्ये ग्राहकांच्या समस्या, अडचणी, तक्रारी,प्रश्न ऐकून त्यांचे प्राधान्याने निवारण करण्यात यावे. यावेळी आपल्या विभागातील सर्व सहाय्यक अभियंते व त्यावरील अधिकारी उपस्थित असावेत असे आदेश आहेत. त्याप्रमाणे कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून बंद असलेला हा "तक्रार निवारण दिन" सुरू करावा.सध्या सर्व व्यवहार सुरळीत चालू झालेले आहेत.
मात्र " तक्रार निवारण दिन" सुरू नसल्याने ग्राहकांच्या मिटर रिडिंग, जादा बील,वीज बील वेळेवर न मिळणे, शेतकऱ्यांना वेळेत डीपी न मिळणे,दुरुस्ती न होणे, नवीन मीटर न मिळणे,इ.तक्रारीत वाढ होत असल्याचे जाणवते.
त्यामुळे या नोव्हेंबर महिन्यातील तिसरा बुधवार (१६/११/२०२२) पासून तक्रार निवारण दिनाचे आयोजन करुन त्याची वेळ व ठिकाण वृत्तपत्रातून पूर्वप्रसिद्ध करावे. वीज ग्राहकांना हे व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, विनोद भरते, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, (बार्शी),कार्यकारिणी सदस्य अण्णा ऐतवाडकर, उपेंद्र केसकर,भागवत शिंदे (अकलूज) यांनी केली आहे.