मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
काही वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असताना वायकर साहेबांनी संघटनात्मक जे काम केले होते त्यामुळे परभणी मध्ये शिवसेनेची बांधणी भक्कम झाली होती. तेथील शिवसैनिक, पदाधिकारी नेहमी वायकर साहेबांना येऊन भेटत असत आणि त्यांना नेहमी विनंती करायचे की साहेब तुमच्यासारखे संपर्कप्रमुख आतापर्यंत आम्ही पाहिले नाहीत. तुमचे ते प्रेम, जिव्हाळा शिवसैनिकांवरील प्रेम या सर्व गोष्टींनी आम्ही भारावलो होतो.
साहेब , आपण जर पुन्हा परभणी संपर्कप्रमुख झालात तर आम्हाला फार आनंद होईल आणि संघटनेसाठी शिवसेनेसाठी ते फार गरजेचे आहे.मला वाटतं अशा प्रकारच्या सातत्याने मागण्या परभणीचे शिवसैनिक, पदाधिकारी मनोमन करत होते अर्थात केवळ त्यांची भावना ते व्यक्त करायचे आणि त्यांच्या मनापासून केलेल्या मागणीचा, अंतर्मनाचा आवाज आपले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला असावा आणि म्हणूनच कदाचित आमदार श्री रवींद्र वायकर साहेब यांची परभणी जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाली आणि परभणीतील शिवसैनिकांमध्ये एक उत्साह संचारला आहे.
आज मी काही जणांना आज फोन करून सांगितले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला काहीजण तर वायकर साहेबाना भेटण्यासाठी आम्ही आजच मुंबईला येतो असेही म्हणाले. हेच त्यांचे प्रेम आणि वायकर साहेबांचे शिवसैनिका बद्दल असलेला आदरभाव दिसून येत आहे.