मायणी प्रतिनिधी
"आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचा इतिहास महात्मा फुले यांच्या विचारधारेला केंद्रस्थानी ठेवून लिहिला गेला पाहिजे. स्त्रिया व शूद्रातिशूद्रांना शिक्षण व समान संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य महात्मा फुलेंनी केले." असे प्रतिपादक साहित्यिक प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले.
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने महात्मा फुले स्मृतिदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर माळी यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. उत्तम टेंबरे, डॉ. लक्ष्मण जठार, प्रा. श्रीकांत कांबळे, प्रा विकास कांबळे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.