कौठाळी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पाळीव व भटक्या कुत्र्याचे 100% निर्भीजीकरण करण्यात आले. कौठाळी व परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे येथील ग्रामस्थांना व जनावरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे अनिमल राहत संस्थेच्या सहकार्याने निर्भीजीकरण करण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावातील ग्रामपंचायतीने भटक्या व पाळीव कुत्र्याचे निर्भीजीकरण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. राकेश चितोडा यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. प्रल्हाद भिसे, डॉ. चेतन यादव, डॉ. राकेश चितोडा, डॉ. बाळासाहेब नागटिळक, माधवानंद पवार, विकास दंदाडे, वैभव पाटील, गणेश धोत्रे, सिद्धार्थ सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच अनिल नागटिळक, उपसरपंच रामदास नागटिळक, ग्रामसेवक कृष्णा नवले उपस्थित होते