अनगर प्रतिनिधी
आज लक्ष्मी नगर, अनगर येथे लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या १९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ भीमा कारखान्याचे माजी संचालक सौ. व श्री. नानासाहेब डोंगरे यांच्या शुभहस्ते उसाच्या मोळीचे पूजन करून मोळी गव्हाणी मध्ये टाकून करण्यात झाला.
हा शुभारंभाचा कार्यक्रम मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते मा. आ. राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व करखान्याचे चेअरमन मा. बाळराजे पाटील यांच्या नियोजनात, आमदार मा. यशवंत (तात्या) माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी संचालक अजिंक्यराणा पाटील यांनी बोलताना आश्वासन दिले की, कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन वेळी बाळराजे पाटील यांनी जाहीर केलेला, एप्रिल महिन्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस आला आहे त्यांना १५० रुपयांचा हप्ता व कर्मचाऱ्यांसाठी तीन पगारी एवढा दिवाळी बोनस येत्या १५ तारखेपर्यंत देण्यात येईल. तसेच भविष्यात संस्थेचा लेखा-जोखा घेऊन कामगारांचे हित जोपासत त्यांचा पगार वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल असेही अजिंक्यराणा पाटील यांनी सांगितले.
यावेळी श्री. हणमंत पोटरे, श्री. देवानंद गुंड-पाटील, श्री. प्रकाश कस्तुरे (मालक) श्री. हरिश्चंद्र चवरे, श्री. भाऊसाहेब सलगर, श्री. बबन गोडसे, श्री. दिपक माळी, श्री. अस्लम चौधरी, श्री. भारत सुतकर, श्री. भीमराव जरग, श्री. रामदास चवरे, श्री. माऊली चव्हाण, श्री. शिवाजी सोनवणे, श्री. विक्रम पाटील, श्री. राजाभाऊ गुंड, श्री. दत्तातय पवार, श्री. धनाजी गावडे, श्री. रामचंद्र क्षिरसागर, श्री. नागेश साठे, श्री. प्रविण पाटील, श्री. राजकुमार पाटील, श्री. बबन दगडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. ओमप्रकाश जोगदे साहेब आदींसह सर्व संचालक मंडळ सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.